या पुस्तकात जगातील सर्वांत मोठी लोकशाही अस्तित्वात कशी आली या घटनेचा मानवी पैलू सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. चमकदार उदाहरणं आणि सखोल संशोधनानं समृद्ध अशा या पुस्तकासोबत बीबीसी रेडिओ सीरिज या मालिकेच्या माध्यमातून लेखकाने अध्यात्म क्षेत्रातील भगवान बुद्धांपासून ते भांडवलशहा धीरूभाई अंबानींपर्यंत 50 भारतीय जीवनांचा आढावा घेतला आहे. याच व्यक्तिरेखांनी भारताच्या समृद्ध, विविधतेनं नटलेल्या वारशावर आणि तिथं निर्माण होणार्या संकल्पनांवर दिव्य प्रकाश टाकला आहे. इतिहास घडवणार्या सम्राट, योद्धे, तत्त्वज्ञ, कवी, अभिनेते आणि उद्योजक यांची तीक्ष्ण, प्रसंगी झोंबणारी व्यक्तिचित्रं या पुस्तकात रेखाटली आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!