टाकाऊ पदार्थ कसे खत बनत असतात व त्यातून त्याच वेळी निसर्गातील कार्बनचक्र, नत्रचक्र या चक्रांना योग्य गती कशी मिळते... योग्य वनस्पतिसृष्टीशी हातमिळवणी केली तर पुन्हा आपणास उपयुक्त असे अनेक नवनवे पदार्थ कसे मिळविता येतात... शेतातील काढलेले तण शेतातच परत कसे गेले पाहिजे...आपल्या परिसरातील वनस्पती, प्राणी इत्यादी सजीवसृष्टीने टाकाऊ म्हणून टावूÂन दिलेल्या सर्व घटकांचे, आपल्या नव्या गरजा भागवण्यासाठी वापर करण्याचे शास्त्र सप्रयोग सांगणारे... परिसरात वाNयावर उधळला जाणारा पालापाचोळा व शेताच्या बांधावर कुजून पडलेले गहू, ज्वारीची धाटे, कांडे-धसकटे व टरफले आपल्या परिसराशी काहीतरी नेमके नाते सांगत आहेत याची जाणीव देणारे... कृषिवैज्ञानिक समाजजीवनाची स्थिर पायाभरणी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक