न्यायाची चाड बाळगायची तर केवळ चर्चा करून, सोयीस्करपणे गप्प बसून भागत नसते. दुष्पप्रवृत्तीविरुद्ध कधी ना कधी लढा पुकारावाच लागतो. आणि लढाई झाली की वार होणारच! ते झेलण्याची, प्रसंगी होणा-या जखमा सहन करण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रासंगिक फायद्यावर नजर ठेवून सर्वांनी वागायचे ठरवल्यास सत्य कधीच प्रस्थापित होणार नाही!