या देशात श्रीमंती निर्माण करायचीय
की दारिद्र्याचं समान वाटप करायचंय?’
समतेच्या पुजाऱ्यांना हा आहे
एका उद्योजकाचा खडा सवाल!
सरळ सामना आहे .. दुरंगी सामना आहे.
एक रंग समतेचा आहे, दुसरा क्षमतेचा!
एका बाजूला आहेत
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या
उद्योजकांचे प्रतिनिधी – अनंतराव नवाथे.
तर दुसरीकडे आहेत
समतेवर आधारित समाजासाठी
अवघं आयुष्य वाहिलेले – अप्पासाहेब लिमये.
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशालाही
अभिमान वाटावा, अशी दोन
तुल्यबळ व्यक्तिमत्त्वं आमने सामने आहेत.
आणि अटीतटीच्या या ‘सामन्या’चा निकाल
आता फक्त तुमच्या हातात आहे