'संघर्ष आणि झगडा यांनी भरलेल्या जगात माझं स्थान काय? दैनंदिन ताणतणावांना कसं सामोरं जाऊ? माझं आयुष्य आनंदी आणि अर्थपूर्ण कसं होऊ शकेल? हे आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि युवक राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सातत्यानं विचारत असतात. त्यांना उत्तर म्हणून, हे पुस्तक जीवनाकडे पाहण्याचा आध्यात्मिक दृष्टीकोन अधोरेखित करतं. जागतिकीकरण म्हणजे सुखाचा जल्लोष आणि जग म्हणजे केवळ संघर्षाची रंगभूमी या दोन टोकांच्या युक्तिवादांच्या मधला मानवतावादी मार्ग सुचवणारे, आत्मपरिक्षणाला उद्युक्त करणारे हे जीवनाच्या प्रयोजनविषयीचे संवाद!
Thanks for subscribing!
This email has been registered!