पालकांच्या इच्छेखातर आयआयटीची परीक्षा दिलेला अर्जुन मनातून भारतीय नौदलात जाण्याचं स्वप्न बाळगतो आहे. एनडीए की आयआयटी या गोंधळात पडलेल्या अर्जुनला शेवटी त्याचं कुटुंबच पाठिंबा देतं. त्याच्या स्वप्नांची वाट मोकळी होते. आणि अर्जुन एनडीएत दाखल होतो. एनडीएच्या प्रशिक्षणानंतर तो सैन्यातील एका गुप्त आणि महत्त्वपूर्ण मिशनचा भाग होतो. त्याच्यासाठी देशसेवा बजावण्याची ही नामी संधी असते. पण तिथल्या वातावरणाने आणि काही घडामोडींनी त्याच्या पुढे अनेक नवी आव्हानं उभी राहतात. आणि देशसेवेत राहण्याच्या त्याच्या इच्छाशक्तीवरच परिणाम होतो. या वैचारिक दुविधेतून तो तिथून बाहेर पडायचा निर्णय घेत असतानाच दोनशे प्रवाशांना घेऊन जाणार एक विमान अपहृत होतं...आणि अर्जुनपुढे पुन्हा नवा पेच निर्माण होतो.