'समान मानव माना स्त्रीला असे कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात. वास्तवात मात्र किमान मानव माना स्त्रीला अशी विनवणी करावी लागते. Man is a rational being. माणूस सुज्ञ, तर्कनिष्ठ असतो असे अँरिस्टॉटलने म्हणून ठेवले आहे. परंतु स्त्रीविषयी विचार करताना, तिच्याशी वागताना मात्र तो तसा राहत नाही. म्हणून तर मानवी हक्कांची सनद लिहिली गेली, तेव्हा त्यात स्त्रीला कुठलेच हक्क दिले गेले नाहीत. कालांतराने स्त्रियांनीच सुज्ञ होऊन, तर्कनिष्ठ राहून आपणसुध्दा आधी मानव आहोत हे सांगण्यास सुरुवात केली. त्यांचे हे सांगणे म्हणजेच स्त्रीमुक्तिवाद. किमान तो तरी सुज्ञपणे आणि तकनिष्ठ राहून समजून घ्यावा यासाठी हा पुस्तक प्रपंच.
Thanks for subscribing!
This email has been registered!