या कथासंग्रहामधल्या सर्वच कथा स्त्रीमनाचा तळ शोधणाऱ्या आहेत. स्त्री ! मग ती नागर असो किंवा ग्रामीण; ती षोडशा असो किंवा प्रौढ वयाची... समाजपरंपरेने, कुटुंबपद्धतीने तिच्या समोरच्या वाटेवर जणू प्रश्नांची उतरंड रचून ठेवलेली असते. जगणे भाग असते. कधी कुणी कोसळून पडते, तर कुणी निर्धाराने तिठा पार करते. कधी आपले ‘घरकूल’ सोडून आसऱ्याचा ‘आसरा’ घेणे भाग पडते- या सर्वजणींच्या प्रश्नांचा मागोवा घेत, उकल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कथांचा संग्रह : ‘असं म्हणू नकोस’.