या विश्वाच्या अथांग सागराच्या किनाNयावर आपल्या पाऊलखुणा उमटवत माणसाने आपला प्रवास सुरू केला अन् त्याच प्रवासात त्याला ह्या विश्वाचे रहस्य खुणावू लागले.... विश्वसागराची गाज बोलवू लागली. आपल्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्यासाठी त्याने ह्या सागरात आपले पाय हळूच भिजवले, तेव्हा त्याला त्याच्या गतकाळाची, इतिहासाची साद ऐवूÂ आली. ही साद ऐकत असताना त्याने जो प्रवास सुरू केला, त्यात त्याला एक साथीदार गवसला... मित्र मिळाला... हा मित्र कसा आहे? मित्र जसा असावा तसा आहे! खNयाला खरे म्हणणारा अन् खोट्याला खोटे! धर्म, जातपात, भाषा, राष्ट्र, अधिकार, मान-सन्मान, स्थान ह्या कशाकशाचीही पर्वा न करणारा, केवळ सत्य तेच सांगणारा अन् सांगता सांगता, माणसाच्या बोटाला धरून पुढे नेणारा...