’अंधाराचे वारसदार’ या कादंबरीत प्रा. मोरे यांनी आजच्या बदलत्या समाज वास्तवाचे प्रखर आणि दाहक दर्शन घडविलेले आहे. झोपडपट्टीतील जीवनाचे असे विदारक दर्शन अपवादानेच मराठी साहित्यात आढळते. ठाामीण जीवनातील खोलवर रूजलेले संस्कार आणि शहरी भोगवादी, चंगळवादी जीवनाची ओढ, त्यातील ताणतणाव, जगण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष यांचे कलात्मकतेने केलेले चित्रण या कादंबरीची उंची वाढविते. कलावंताकडे असणारी वर्ण्यविषयासंबंधीची तादात्म्यता, तटस्थता आणि आंतरिक तळमळ यामुळे ही कादंबरी, एकूण मराठी कादंबरी वाङ्मयाला वेगळे परिमाण प्राप्त करून देणारी ठरली आहे. आजच्या युवा पिढीची मानसिकता, जगण्याची अपरिहार्यता उलगडत जाताना ही कादंबरी प्रादेशिकतेच्या, भाषेच्या सीमा ओलांडून वैश्विकतेकडे झेप घेते. हेच या कादंबरीचे यश आहे.