प्राचीन काळापासून अकबर-बिरबलाच्या कथा मुलांचे मनोरंजन करत आल्या आहेत. खळखळून हसवणाऱ्या या कथा मुलांची तार्किक शक्ती वाढवून बुद्धीला चालना देतात.
बिरबलाचे हजरजबाबीपणा, न्यायप्रियता, दुर्बलांना मदत करणे या गुणांबरोबरच केव्हा कसे वागावे हेही शिकवतात. त्याबरोबरच मुलांना बिरबलासारखे बुद्धिमान बनवण्यासाठी गोष्टीनंतर मार्गदर्शन केले आहे. असा हा ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असलेल्या कथा प्रत्येक मुलाच्या संग्रही असायलाच पाहिजे.