काही स्त्रिया जन्मत:च उद्योगिनी असतात कारण त्यांच्या घरातील पिढ्यानपिढ्या चालणार्या व्यवसायामुळे त्यांना व्यवसायाचे बाळकडू मिळालेले असते, काही महिलांवर उद्योगाची जबाबदारी लादली जाते ती वडील, पती किंवा भावाच्या आजारपणामुळे किंवा अकाली निधनामुळे, तर काही महिला स्वत: प्रयत्नपूर्वक उद्योजिकेचे गुण विकसित करतात. अशा तिन्ही प्रकारांत मोडणार्या महिला आपल्याला या पुस्तकात भेटतात.
पतीच्या अकाली निधनानंतर अत्यंत खंबीरपणे व धडाडीने त्यांचा व्यवसाय चालवणार्या शीला साबळे व उद्योगाची माहिती नसताना कारखाना चालवणार्या उषा शिंदे, वडिलांच्या निधनानंतर एका कारखान्याचे तीन कारखाने करणार्या सुजाता सोपारकर आणि रेडिमेड ब्लाऊजचा व्यवसाय चालवणार्या श्वेता इनामदार इ. महिलांनी खडतर व बिकट वाट कशी पार केली ते वाचण्यासारखे आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!